सोलापूर दि. 4 : भाजपने आतापर्यंत कोणतेही विकासकाम केलेले नाही, फक्त आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत. म्हणून भाजपचा पराभव करून त्यांना आता घरी बसवायचे आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील प्रचार सभेत केले.

वंचित बहुजन आघाडी हा कार्यकर्त्यांचा एकमेव पक्ष आहे. ज्यांनी पक्षासाठी काम केले, संघर्ष केला, त्यांनाच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. मागील विधानसभेत ३६ युवकांना उमेदवारी देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले. आता महानगरपालिकेत ५० टक्के उमेदवारी युवकांना देण्यात आली आहे.

वंचित व शोषित समाजाला उमेदवारी देऊन त्यांची ताकद उभी करून वंचित बहुजन आघाडीने त्यांना निवडून आणले आहे.सोलापुरात वडार, कैकाडी, लिंगायत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाजाला वंचितने उमेदवारी दिली आहे.आपला पक्ष ओळखा आणि वंचितांच्या न्याय व हक्काच्या लढ्यात सामील व्हा.वंचित बहुजन आघाडी सोलापूरतसत्तेत आल्यास, प्रत्येक घराला नळ आणि नळाला पाणी देण्याचे काम केले जाईल.

३०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारून प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल.सरकारी शाळांना सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण व सोयी-सुविधा देऊन मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.एमआयडीसी पुन्हा सुरू करून पाच हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.ही निवडणूक सोलापूरच्या विकासासाठी आणि वस्ती-नगराची परिस्थिती बदलण्यासाठीची निवडणूक आहे हे सर्व जर करायचे असेल तर, सोलापूरकरांनी महानगरपालिकेत एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावे असे ही ते पुढे म्हणाले.

