सोलापूर दि. 18 : पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ शनिवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ५ मित्रांचा जागीच अंत झाला, तर एक महिला या अपघातातून थोडक्यात बचावली.
माला रवी साळवे (वय 40 वर्षे , पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल),अर्चना तुकाराम भंडारे (वय 47 वर्षे, सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्टमाला) रवी साळवे (वय 40 वर्षे , पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल) अर्चना तुकाराम भंडारे (वय 47 वर्षे, सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट रायगड) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. तर ज्योती जयदास टाकले (वय ३७ वर्ष, सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र मिळून कारने (क्र. MH-46 Z 4536) स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. रात्री ११:३० च्या सुमारास गाडी देवडी पाटीजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने कार रस्त्यापासून तब्बल १० ते १५ फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. अपघाताची भीषणता पाहून पोलीसही हादरले.
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली.या दुर्दैवी घटनेत ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. ज्योती जयदास टाकले (वय ३७ वर्ष, सेक्टर ७, पनवेल) या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाल्या असून, सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
